Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Jio network down :जिओ नेटवर्क ठप्प; ग्रामीण भागातील ग्राहकांचे व्यवहार खोळंबले

Jio network down : बीबी परिसरात जिओ कंपनीच्या मोबाईल नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यामुळे ग्रामीण भागातील जिओ सिमधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नेटवर्क खंडित झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Jio network down

चार दिवस सेवा खंडित झाल्याने नागरिक संतप्त, नुकसानभरपाईची मागणी

रमेश खंडागळे 

बीबी  : बीबी परिसरात जिओ कंपनीच्या मोबाईल नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यामुळे ग्रामीण भागातील जिओ सिमधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नेटवर्क खंडित झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

१० फेब्रुवारी २०२६ पासून जिओची मोबाईल सेवा खंडित झाली असून १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान लोणार व सिंदखेडराजा तालुक्यात अनेक ठिकाणी मोबाईलला रेंज मिळत नसल्याची तक्रार आहे. परिणामी नागरिकांचा परस्परांशी संपर्क तुटला असून मोबाईलवर केवळ ‘हॅलो-हॅलो’ इतकाच आवाज ऐकू येत असल्याचे ग्राहक सांगत आहेत. मोबाईल नेटवर्क बंद असल्याने फोनपे, गुगल पे यांसारखे डिजिटल व्यवहार करता आले नाहीत. काही नागरिकांचे वैद्यकीय, लग्नसमारंभ तसेच इतर तातडीचे आर्थिक व्यवहारही अडचणीत आले. अनेकांची महत्त्वाची कामे रखडल्याने मानसिक ताण वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.

ग्राहकांकडून प्रीपेड रिचार्जचा पैसा आधीच घेतला जातो; मात्र सलग चार दिवस सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सेवा न दिल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल कंपनीने ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top