Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Jio network down :डोणगाव परिसरात जिओ नेटवर्क ठप्प; नागरिक त्रस्त, जनजीवन विस्कळीत

Jio network down :गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिलायन्सची मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा पूर्णतः बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळत असली तरी त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

Jio network down
डोणगाव : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिलायन्सची मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा पूर्णतः बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळत असली तरी त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
नेटवर्क व इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयांची कामे ठप्प झाली आहेत. ऑनलाईन बँकिंग, यूपीआय व्यवहार, शैक्षणिक उपक्रम आणि व्यावसायिक देवाणघेवाणीवर मोठा परिणाम झाला आहे. मोबाईल कॉलही लागत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे कठीण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील लाखो जिओ ग्राहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता अत्यावश्यक दूरसंचार सेवा बंद ठेवणे ही अत्यंत गंभीर व निष्काळजीपणाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश टाले यांनी सांगितले की, “नेटवर्क सेवा ही आज अत्यावश्यक गरज बनली आहे. ती अचानक बंद होणे म्हणजे नागरिकांचे हक्क डावलण्यासारखे आहे. जिओ कंपनीने तात्काळ सेवा पूर्ववत करून संपावर तोडगा काढावा व ग्राहकांची अधिकृत दिलगिरी व्यक्त करावी; अन्यथा ग्राहक मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या दूरसंचार कंपनीकडे पोर्ट करण्याचा निर्णय घेतील.”
सेवा बंद राहिलेल्या कालावधीमुळे झालेल्या आर्थिक व मानसिक नुकसानीची भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, TRAI तसेच संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तात्काळ कार्यवाही न झाल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य भगवानराव बाजड आणि हेमराज शर्मा यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top