Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Election fever :५९ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी; एप्रिल अखेरीस होणार मतदान

Election fever : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ५९ ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकांमुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असतानाच, आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे राजकीय नेत्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.

Election fever

स्थानिक राजकारणाला वेग; ग्रामपंचायत पोटनिवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ५९ ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकांमुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असतानाच, आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे राजकीय नेत्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.

१७ मार्च २०२६ च्या मध्यरात्रीपासून संबंधित गावांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निकाल जाहीर होईपर्यंत ती प्रभावी राहणार आहे. या कालावधीत मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय, घोषणा किंवा कार्यक्रम राबविण्यावर निर्बंध असणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, ३० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ७ ते १३ एप्रिल दरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. १५ एप्रिल रोजी छाननी होईल, तर १७ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

या निवडणुकांसाठी मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता असून, विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top