Mahabreaking

🔴 BREAKING
House Catches Fire :बाळापुरात घराला आग, साहित्य जळून खाक, गोरे कुटुुंबाचा संसार उघड्यावर  Health Department :जलकुंभात मृत वानर ; खिरपुरी येथे आरोग्य विभागाची घरोघरी पाहणी; पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले! Severe Water Scarcity in Lohara :लोहारा गावात भीषण पाणीटंचाई; भर उन्हात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती Funds amounting :जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३७ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर Vishwadip Padol  :अमेरिकेसोबत केलेल्या कृषी करार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा- विश्वदिप पडोळ Self-Defense Training :बुलढाण्यात नारीशक्तीला मिळणार स्वसंरक्षणाचे धडे! House Catches Fire :बाळापुरात घराला आग, साहित्य जळून खाक, गोरे कुटुुंबाचा संसार उघड्यावर  Health Department :जलकुंभात मृत वानर ; खिरपुरी येथे आरोग्य विभागाची घरोघरी पाहणी; पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले! Severe Water Scarcity in Lohara :लोहारा गावात भीषण पाणीटंचाई; भर उन्हात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती Funds amounting :जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३७ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर Vishwadip Padol  :अमेरिकेसोबत केलेल्या कृषी करार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा- विश्वदिप पडोळ Self-Defense Training :बुलढाण्यात नारीशक्तीला मिळणार स्वसंरक्षणाचे धडे!

Water shortage :उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुसरबीडमध्ये पाणीटंचाई; संतप्त महिलांची ग्रामपंचायतीत धडक

Water shortage : उन्हाळ्याची चाहूल लागताच दुसरबीड परिसरात पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची जोरदार मागणी केली.

Water shortage
 दुसरबीड :उन्हाळ्याची चाहूल लागताच दुसरबीड परिसरात पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची जोरदार मागणी केली.

गावातील अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे पाण्याचा ताण वाढत असून महिलांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून गावात सोडले जाणारे पाणी गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाण्यासाठी महिलांना दूरवर जावे लागत असल्याने एका भांड्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, पाणी आणताना पाय घसरून एका महिलेचा हात मोडल्याची घटना घडल्याने गावात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
महिला ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचल्या असता सरपंच व सचिव अनुपस्थित असल्याने त्यांचा संताप आणखी वाढला. पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू न केल्यास पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.
याबाबत ग्रामपंचायत सचिव अशोक बुरकुल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. तसेच गटविकास अधिकारी बांगर यांनी संबंधित सरपंच व सचिवांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे सांगितले. पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उन्हाळा अजून पूर्णपणे सुरूही झाला नसताना गावात निर्माण झालेली ही पाणीटंचाईची स्थिती गंभीर ठरत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top