Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Deulgaon Raja…: सर्वपक्षीय नेत्यांच्या नजरा आता देऊळगाव राजाकडे…

Deulgaon Raja…: न्यायालयीन प्रक्रियेमुळे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली नगरपालिका निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश येताच नेत्यांसह उमेदवारांची धावपळ वाढली आहे.देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक इतिहासात प्रथमच मतदारसंघातील आजी-माजी नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे जिल्ह्यासह राज्यस्तरीय नेत्यांच्या नजरा येथील पालिका निवडणुकीकडे लागल्या आहेत. कधीकाळी एकहाती सत्ता असलेल्या नेत्यांना यावेळी प्रतिस्पर्धी नेत्यांशी हातमिळवणी करून आघाडी करावी लागल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Deulgaon Raja…
‘आपलाच विजय’चा दावा; मात्र विकासाचा जाहीरनामा नाही

गजानन तिडके

देऊळगाव राजा :
न्यायालयीन प्रक्रियेमुळे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली नगरपालिका निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश येताच नेत्यांसह उमेदवारांची धावपळ वाढली आहे.देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक इतिहासात प्रथमच मतदारसंघातील आजी-माजी नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे जिल्ह्यासह राज्यस्तरीय नेत्यांच्या नजरा येथील पालिका निवडणुकीकडे लागल्या आहेत. कधीकाळी एकहाती सत्ता असलेल्या नेत्यांना यावेळी प्रतिस्पर्धी नेत्यांशी हातमिळवणी करून आघाडी करावी लागल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे पार पडल्या. आजी-माजी नेत्यांनी गल्लीबोळ पिंजून काढत ‘आम्हीच श्रेष्ठ’ हे सामान्य मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कालावधीसाठी प्रचाराला विराम मिळाल्याने आता १२ तारखेपासून निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामुळे उमेदवारांची चांगलीच घालमेल होत असल्याचे चित्र आहे. पूर्वीच्या घटनांकडे मतदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत असल्याने, सर्व यंत्रणा पुन्हा नव्याने कार्यान्वित कराव्या लागत असून उमेदवारांचे अर्थचक्र कोलमडल्याचे जाणवत आहे.

कालावधी वाढला, पण खर्च तोच कायम?
न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली असली, तरी उमेदवारांचा खर्च मात्र तोच कायम असल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाग व नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च आणि येत्या सात ते आठ दिवसांत होणारा खर्च याचे गणित कसे जुळवायचे, हा प्रश्न उमेदवारांसमोर उभा आहे.

निवडणूक काही तासांवर येऊन ठेपलेली असताना नगराध्यक्ष व प्रभागातील सर्वच उमेदवारांनी खर्चाच्या बाबतीत हात सैल केला होता. नगराध्यक्ष पदासाठी साडेसात लाख रुपये, तर नगरसेवक पदासाठी अडीच लाख रुपयांची खर्च मर्यादा निवडणूक विभागाने निश्चित केली असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासंदर्भात अद्याप कोणताही सुधारित अध्यादेश प्राप्त झालेला नसल्याचे स्थानिक निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिवेशन आणि निवडणूक प्रक्रिया
जिल्ह्यात काही तुरळक भाग वगळता बहुतांश नगरपालिका निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, निवडणूक निकाल एकाच वेळी जाहीर होणार असल्याने नेत्यांसाठी राजकीय गणित मांडणे अवघड झाले आहे. एकीकडे नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसरीकडे देऊळगाव राजा पालिका निवडणूकही तितकीच महत्त्वाची ठरत आहे.

येथील विविध आघाड्या व युती असल्या, तरी स्थानिक आजी-माजी नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राज्यस्तरीय नेत्यांना येथे सभा घेण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. अतिरिक्त सभा झाल्यास उमेदवारांवर आर्थिक ओझे अधिक वाढणार असल्याने, उमेदवारांची ‘नाकी नऊ’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिवेशन काळातच वरिष्ठ नेत्यांना येथे यावे लागणार असल्याने, त्यांच्या समोरही दुहेरी अडचण उभी ठाकल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top