Mahabreaking

[breaking_news]

Scholarship scheme : कामगार कल्याण मंडळाच्या शिष्यवृत्ती योजना सुरू

Scholarship scheme : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाअंतर्गत कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने कामगार आस्थापनांतील कर्मचारी वर्गाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ सर्व पात्र कामगार पाल्यांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रसंचालक नंदकिशोर खत्री यांनी केले आहे.

Scholarship scheme

कामगार पाल्यांनी घ्यावा लाभ – केंद्रसंचालक नंदकिशोर खत्री यांचे आवाहन

बुलढाणा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाअंतर्गत कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने कामगार आस्थापनांतील कर्मचारी वर्गाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ सर्व पात्र कामगार पाल्यांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रसंचालक नंदकिशोर खत्री यांनी केले आहे.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ दरवर्षी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध आर्थिक लाभाच्या योजना राबविते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता इयत्ता १०वी पासून उच्च शिक्षणापर्यंत तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

या योजनांमध्ये –

  • सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना

  • एमपीएससी/युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

  • परदेशी उच्च शिक्षण सहाय्य योजना

  • क्रीडा शिष्यवृत्ती योजना

  • एमएस-सीआयटी सहाय्य योजना

  • शासकीय संगणक टंकलेखन (GCC–TBC) आर्थिक सहाय्य योजना

  • पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना

  • गंभीर आजार सहाय्य योजना

  • शिवणयंत्र अनुदान योजना
    अशा विविध योजनांचा समावेश आहे.

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ असून, अर्ज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर — https://public.mlwb.in — ऑनलाइन सादर करता येईल.

कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी, सार्वजनिक व सहकारी बँका, पतसंस्था, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एलआयसी, मार्केटिंग फेडरेशन, वीज महामंडळ, सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, खाजगी हॉस्पिटल्स, दुकाने, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, विविध मिल्स, प्रिंटिंग प्रेस, खादी ग्रामोद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्या, बीएसएनएल, कापूस महासंघ, वाहतूक व ट्रान्सपोर्ट संस्था, विमा कंपन्या, कृषी उद्योग महामंडळे, दैनिक वृत्तपत्रे, कुरिअर कंपन्या आणि विविध फॅक्टरी ॲक्ट अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांतील कामगारांची नोंद असलेल्या पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो.

ज्या कामगारांच्या जून २०२५ च्या पगारातून कामगार कल्याण निधी म्हणून २५ रुपये कपात झाले आहेत, आणि ज्यांच्या पाल्यांनी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्णता प्राप्त केली आहे, त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल, असेही केंद्रसंचालक नंदकिशोर खत्री यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी –
कामगार कल्याण केंद्र, राममंदिराजवळ, अजिंक्य-वैभव मंगल कार्यालयाच्या शेजारी, अयोध्या नगर, कारंजा चौक, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन खत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top