Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Kisan Samman Nidhi subsidy :मुख्यमंत्री किसान सन्मान निधीच्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित

Kisan Samman Nidhi subsidy : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या अनुदानापासून तालुक्यातील अनेक शेतकरी विविध तांत्रिक कारणांमुळे वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

Kisan Samman Nidhi

ज़ाकिर अहमद

बाळापूर  : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या अनुदानापासून तालुक्यातील अनेक शेतकरी विविध तांत्रिक कारणांमुळे वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांनी बाळापूर येथील तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.

मात्र, विविध तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पडताळणी, बँक खात्यांमधील त्रुटी तसेच ऑनलाइन प्रक्रियेतील अडथळे यांमुळे तालुक्यातील जवळपास ३० टक्के शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर अनुदानाचा लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top