Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

district’s average rice yield is 52 paise : ढगफुटी,पुरात पिके वाहून गेल्यानंतरही जिल्ह्याची सरासरी आणेवारी ५२ पैसे 

district’s average rice yield is 52 paise : जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी, पूर आदीमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना प्रशासनाने १ ऑक्टाेबर राेजी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्याची सरासरी ही ५२ पैसे काढली आहे. याचा अर्थ खरीत हंगामात जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे असा हाेताे. त्यामुळे, येणाऱ्या काळात जिल्ह्याला मदत मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

district's average

तब्बल ८३२ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त तर ५८८ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी
बुलढाणा : जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी, पूर आदीमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना प्रशासनाने १ ऑक्टाेबर राेजी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्याची सरासरी ही ५२ पैसे काढली आहे. याचा अर्थ खरीत हंगामात जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे असा हाेताे. त्यामुळे, येणाऱ्या काळात जिल्ह्याला मदत मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आणेवारीचा पहिला टप्पा असून अंतिम आणेवारीत यामध्ये बदल हाेण्याची शक्यता आहे. पण आता पाउस किंवा इतर संकटे नसताना त्यामध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तब्बल ८३२ गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त काढण्यात आली आहे.
यंदाच्या सन २०२५-२६ च्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावातील नजर अंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार सरासरी नजर अंदाज पैसेवारी ५२ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १४२० गावे असून ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ५८८ आहे. तर ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ही ८३२ आहे.
जिल्हा प्रशासनाने ५० पैसेपेक्षा जास्त व कमी पैसेवारी असलेल्या तालुकानिहाय गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या बुलढाणा तालुक्यातील ९८ गावाची सरासरी पैसेवारी ५४ पैसे, देऊळगाव राजा तालुक्यात ६४ गावाची सरासरी पैसेवारी ५२ पैसे, सिंदखेड राजा तालुक्यात ११४ गावाची सरासरी पैसेवारी ५५ पैसे, मोताळा तालुक्यात १२० गावाची सरासरी पैसेवारी ५६ पैसे, नांदुरा तालुक्यात ११२ गावाची सरासरी पैसेवारी ५७ पैसे, खामगांव तालुक्यात १४६ गावाची सरासरी पैसेवारी ५९ पैसे, शेगांव तालुक्यात ७३ गावाची सरासरी पैसेवारी ५३ पैसे, संग्रामपुर तालुक्यात १०५ गावाची ५७ पैसे इतकी सरासरी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या चिखली तालुक्यातील १४४ गावाची सरासरी पैसेवारी ४९ पैसे, मेहकर तालुक्यात १६१ गावाची सरासरी पैसेवारी ४६ पैसे, लोणार तालुक्यात ९१ गावाची सरासरी पैसेवारी ४५ पैसे, मलकापूर तालुक्यात ७३ गावाची सरासरी पैसेवारी ४६ पैसे, जळगाव जामोद तालुक्यात ११९ गावाची ४९ पैसे इतकी सरासरी पैसेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top