Mahabreaking

[breaking_news]

Rajura Village Shaken :राजुरा गाव हादरले; चार मुलांना विहीरीत फेकून पित्याने घेतला गळफास

Rajura Village Shaken :कौटुंबिक वादातून एका पित्याने चार मुलांना विहीरीत फेकून त्याच विहीरीत गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली. तालुक्यातील राजुरा बु. येथे घडलेल्या एका अत्यंत दुःखद घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. एका कुटुंबातील चार निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  विजय मुसा किराडीया रा. राजुरा बु .ता जळगाव जामोद असे आरोपी व पित्याचे नाव आहे.

Rajura Village Shaken

कौटुंबिक वादानंतर उचलले टोकाचे पाऊल :जळगाव जामोद तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना

जळगाव जामोद : कौटुंबिक वादातून एका पित्याने चार मुलांना विहीरीत फेकून त्याच विहीरीत गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली. तालुक्यातील राजुरा बु. येथे घडलेल्या एका अत्यंत दुःखद घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. एका कुटुंबातील चार निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  विजय मुसा किराडीया रा. राजुरा बु .ता जळगाव जामोद असे आरोपी व पित्याचे नाव आहे.

मृतांमध्ये प्रित (वय ७), प्राची (वय ५), पूर्वी (वय ४) आणि पियुष (वय २) या चार चिमुकल्यांचा समावेश आहे. या निष्पाप बालकांच्या अकाली जाण्याने गावातील वातावरण सुन्न झाले असून प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न आहे — एवढ्या लहान जीवांचा काय दोष? घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून कौटुंबिक परिस्थिती, वादाचे कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास केला जात आहे. गावकऱ्यांच्या मते, खेळण्या-बागडण्याच्या वयातील चार चिमुकल्यांच्या जाण्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेमुळे कौटुंबिक तणाव, मानसिक ताण आणि संवादाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top