A farmer committed suicide :सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून मलकापूर पांगरा येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना २९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१, रा. मलकापूर पांग्रा) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा :सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून मलकापूर पांगरा येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना २९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१, रा. मलकापूर पांग्रा) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्णतः नष्ट झाले. त्यामुळे नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे बाबुराव देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. नेहमीप्रमाणे शेतातील मोटर चालू करण्यासाठी ते शेतात गेले असता, उंबराच्या झाडाला पिवळ्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी “आमचा कोणावरही संशय नाही,” अशी फिर्याद अमोल संजयराव देशमुख (वय ३०) यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेचा तपास साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निवृत्ती पोफळे हे करीत आहेत.या घटनेमुळे मलकापूर पांगरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

