Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

scholarship exam :जिल्ह्यात उद्या पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा; २८ हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

scholarship exam : इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यात एकाच वेळी पार पडणार आहे. जिल्हाभरात एकूण २३१ परीक्षा केंद्रांवर तब्बल २८ हजार ६९ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

scholarship exam

बुलढाणा : इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यात एकाच वेळी पार पडणार आहे. जिल्हाभरात एकूण २३१ परीक्षा केंद्रांवर तब्बल २८ हजार ६९ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

इयत्ता पाचवीसाठी १२६ केंद्रांची तर इयत्ता आठवीसाठी १०५ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १६,१६६ विद्यार्थी तर आठवीसाठी ११,९०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून हे सर्व विद्यार्थी निर्धारित केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हास्तरावरून तेरा तालुक्यांमध्ये भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच तालुकास्तरावरही स्वतंत्र भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र संचालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

विकास पाटील (शिक्षणाधिकारी, प्राथमिक) व जयमाला राठोड (जिल्हा समन्वयक) यांनी सर्व केंद्रप्रमुखांना परीक्षेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना देत आवश्यक दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या परीक्षेच्या नियोजनासाठी ईश्वर वाघ, गजानन वाघ व श्रीकृष्ण जाधव हे सहायक जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेबाबत उत्सुकता असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top