Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

scholarship exam :जिल्ह्यात उद्या पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा; २८ हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

scholarship exam : इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यात एकाच वेळी पार पडणार आहे. जिल्हाभरात एकूण २३१ परीक्षा केंद्रांवर तब्बल २८ हजार ६९ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

scholarship exam

बुलढाणा : इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यात एकाच वेळी पार पडणार आहे. जिल्हाभरात एकूण २३१ परीक्षा केंद्रांवर तब्बल २८ हजार ६९ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

इयत्ता पाचवीसाठी १२६ केंद्रांची तर इयत्ता आठवीसाठी १०५ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १६,१६६ विद्यार्थी तर आठवीसाठी ११,९०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून हे सर्व विद्यार्थी निर्धारित केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हास्तरावरून तेरा तालुक्यांमध्ये भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच तालुकास्तरावरही स्वतंत्र भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र संचालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

विकास पाटील (शिक्षणाधिकारी, प्राथमिक) व जयमाला राठोड (जिल्हा समन्वयक) यांनी सर्व केंद्रप्रमुखांना परीक्षेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना देत आवश्यक दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या परीक्षेच्या नियोजनासाठी ईश्वर वाघ, गजानन वाघ व श्रीकृष्ण जाधव हे सहायक जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेबाबत उत्सुकता असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top