Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

four lakh farmers : जिल्ह्यातील चार लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी हाेणार गाेड!

four lakh farmers : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे २८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत निधीची मागणी केली हाेती. जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९०८ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे, नुकसानामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.१५ ऑक्टाेबर राेजी मदत निधी वितरणीत करण्याविषयी शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

Diwali will be a blessing for four lakh farmers
२८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत हाेणार खात्यात जमा : सप्टेंबर महिन्यातील नुकसानासाठी मदत

बुलढाणा : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे २८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत निधीची मागणी केली हाेती. जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९०८ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे, नुकसानामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.१५ ऑक्टाेबर राेजी मदत निधी वितरणीत करण्याविषयी शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. अनेक तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाउस झाला हाेता. त्यामुळे, नदी, नाल्यांना पूर आल्याने पिके वाहून गेली हाेती. साेयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते.खरीप हंगामातील ३ लाख २९ हजार १५० हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. तसेच १ हजार ३२२ हेक्टवरील बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते. ३ हजार २२० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले हाेते. या नुकसानाचे प्रशासनाने पंचनामे करून जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९०८ शेतकऱ्यांसाठी मदत निधीची मागणी करण्यात आली हाेती. शासनाने जिल्ह्यातील ४ लाखांवर शेतकऱ्यांसाठी २८९ काेटी २७ लाख रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा हाेणार आहे. त्यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

काेरडवाहुसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये मदत
काेरडवाहू शेतीसाठी दाेन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर ८ हजार ५०० रुपये, बगायतीसाठी हेक्टरी १७ हजार आणि बहु वार्षिक पिकासाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये अशी मदत मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ११ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top