Mahabreaking

🔴 BREAKING
Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’ Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’

crop in five acres: तुरीवर ‘मर रोगाचा’ कहर, पाच एकरातील पिकावर फिरवला राेटावेटर

crop in five acres: एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असतानाच शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच डोणगाव परिसरात तुरीवर ‘मर रोगा’चा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या रोगामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाल्याने मादणी येथील शेतकरी अमोल जाधव यांनी हतबल होऊन तब्बल ५ एकर तुरीवर रोटावेटर फिरविला.

crop in five acres

डोणगाव : एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असतानाच शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच डोणगाव परिसरात तुरीवर ‘मर रोगा’चा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या रोगामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाल्याने मादणी येथील शेतकरी अमोल जाधव यांनी हतबल होऊन तब्बल ५ एकर तुरीवर रोटावेटर फिरविला.
मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या पिकात मर रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, शेतकऱ्यांनी दोन-तीन फवारण्या आणि ‘ड्रेंचिंग’ केल्यावरही रोगावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. परिणामी शेवटी रोटावेटर फिरवून पिकावर मात करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे शेतकरी सांगत आहेत.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top