Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

“Pradhan Mantri Awas Yojan: “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० – सर्वांसाठी घरे”चा आमदार कायंदेच्या हस्ते शुभारंभ

“Pradhan Mantri Awas Yojan: नगर परिषद, देऊळगाव राजा अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 – सर्वांसाठी घरे” या योजनेचा शुभारंभ आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते संजय नगर भागात करण्यात आला.

Pradhan Mantri Awas Yojana

३५ वर्षांपासून घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटले समाधानाचे हास्य
देऊळगाव राजा : नगर परिषद, देऊळगाव राजा अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 – सर्वांसाठी घरे” या योजनेचा शुभारंभ आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते संजय नगर भागात करण्यात आला.
गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून नगरपरिषदेच्या हद्दीतील शासकीय जागांवर दुर्बल घटकातील नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांना नियमित घरकुल मिळावे, या हेतूने शासनाच्या सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचे नियमन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उद्घाटन प्रसंगी आमदार मनोज कायंदे म्हणाले की, “प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर मिळावे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. नगरपरिषद आणि नागरिकांच्या सहकार्याने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल.”
यावेळी नगरपरिषद देऊळगाव राजाचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आणि नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
गेल्या तीन दशके स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे समाधानाचे हास्य झळकले. जय शिवसंग्राम संघटनेनेही नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून वारंवार निवेदन देत पाठपुरावा केला होता.
या कार्यक्रमाला अंबर मसाल्याचे संचालक हाजी सिद्दीक सेठ, रफिक मेंबर, हाजी करीमभाई, हनीफ शहा, प्रदीप वाघ, सदाशिव मुंडे, शुभम पाटील, हाजी अमजद खान, अन्वर खान पठाण, जमील सर, आरिफ पठाण, सय्यद नईम, शेख आतिक, नगरपरिषदेचे वानखेडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घरकुल एजन्सीचे शेख आवेस व आवेस पठाण यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top