Mahabreaking

🔴 BREAKING
Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक

20-character limit :निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील नावाच्या 20 अक्षरांच्या मर्यादेमुळे नागरिकांना अडचण

20-character limit : निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन मतदार ओळखपत्र (इलेक्शन कार्ड) बनवण्यासाठी अर्ज करताना नाव लिहिण्याची मर्यादा केवळ 20 अक्षरांपर्यंत निश्चित करण्यात आल्यामुळे अनेक नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांची नावे 20 अक्षरांपेक्षा जास्त असल्याने वेबसाइट पुढील अक्षरे स्वीकारत नाही, त्यामुळे अर्ज प्रक्रियेदरम्यान त्रुटी निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे.

20-character limit

लांब नाव असलेल्या नागरिकांना मतदार ओळखपत्र बनवताना अडचणी; बीएलओच्या कामातील असमानतेमुळे मॅपिंगचे कामही प्रभावित

ज़ाकिर अहमद

बाळापूर : निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन मतदार ओळखपत्र (इलेक्शन कार्ड) बनवण्यासाठी अर्ज करताना नाव लिहिण्याची मर्यादा केवळ 20 अक्षरांपर्यंत निश्चित करण्यात आल्यामुळे अनेक नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांची नावे 20 अक्षरांपेक्षा जास्त असल्याने वेबसाइट पुढील अक्षरे स्वीकारत नाही, त्यामुळे अर्ज प्रक्रियेदरम्यान त्रुटी निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे नाव “मोहम्मद अबुलैस मोहम्मद हबीब” किंवा “महेंद्र सिंह करतार सिंह नरवय्या” असे लांब असल्यास 20 अक्षरांच्या मर्यादेमुळे पूर्ण नाव नोंदवता येत नाही. परिणामी मतदार ओळखपत्रावर नाव अपूर्ण किंवा चुकीचे छापले जाण्याची शक्यता निर्माण होते. पुढे जाऊन आधार कार्ड किंवा इतर शासकीय कागदपत्रांमध्ये दुरुस्ती अथवा अद्ययावत करताना देखील अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण आधार कार्डमध्ये सहसा नाव वडिलांच्या नावासह नोंदवणे आवश्यक असते.

 आधारच्या वेबसाइटवर नाव लिहिण्यासाठी अशी कोणतीही अक्षर मर्यादा नाही आणि तेथे व्यक्ती आपले पूर्ण नाव सहज नोंदवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी मागणी केली आहे की निवडणूक आयोगानेही आपल्या वेबसाइटवरील 20 अक्षरांची मर्यादा रद्द करावी, जेणेकरून नागरिकांची संपूर्ण नावे योग्य प्रकारे नोंदवता येतील आणि भविष्यात कागदपत्रांमध्ये त्रुटी निर्माण होणार नाहीत.

झुबैर अहमद, मतदार

election

  मतदार यादीशी संबंधित कामांमध्ये बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) यांच्या कामातही असमानता दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मतदार यादी क्रमांक 135, 136, 137 आणि 138 अंतर्गत येणाऱ्या बेलदारपुरा, औरंगपुरा, राजपूतपुरा आणि नवा नगर या भागांमध्ये काही बीएलओंनी सुमारे 70 ते 80 टक्के काम पूर्ण केले आहे, तर काही बीएलओंनी अजून 30 टक्के कामही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे मतदार यादीच्या मॅपिंग प्रक्रियेचे बरेच काम अद्याप प्रलंबित आहे आणि नागरिकांना एका बीएलओकडून दुसऱ्या बीएलओकडे फिरावे लागत आहे. याशिवाय मतदार यादी क्रमांक 136 साठी नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओने काम सोडल्याची माहितीही समोर आली असून त्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. स्थानिक नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की वेबसाइटवरील नावाची अक्षर मर्यादा तात्काळ हटवावी तसेच क्षेत्रातील बीएलओच्या कामावर प्रभावी देखरेख ठेवावी, जेणेकरून मतदार यादीशी संबंधित कामे वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण होतील.

मोहम्मद अकरम, नगरसेवक व काँग्रेस गटनेते, नगर परिषद बाळापूर

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top